Friday, September 25, 2020

Financial literacy - भारतातील अर्थसाक्षरता

भारतातील अर्थसाक्षरता

एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. खालील निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत.

-६७% भारतीय हे इंशुरन्सला (विम्याला) गुंतवणुक समजतात – ह्याचे कारण आपली गुंतवणूकीबद्दल असणारी अनभिज्ञता व गावोगावी असणारे विमा प्रतिनिधी, ज्याना भरघोस कमिशन मिळते. जे आपल्या आर्थिक कल्याणाचा आव आणून गुंतवणुकीसाठी विमा सुचवतात व आपला पिछ्छा पुरवतात. व एकदा पॉलिसी घेतली की शक्यतो लांब राहतात.

-   सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा असेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.

-  रिटर्न्स (गुंतवणूकीवरील परतावा) हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके कायहे सांगणारे फक्त २% भारतीय निघाले.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करणारे २२% भारतीय SIP हे एका योजनेच नाव आहे असे समजतात.

-  असेट अलोकेशन(संपत्तीचे विकेन्द्रीकरण) म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.

-  ६३% लोक हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक केल्यावर म्युच्युअल फंडाची पॉलीसी घेतली असे म्हणतात. ते म्युच्युअल फंड्ड म्हणजे इंशुरंन्स मधीलच एक पॉलीसीसारखा प्रकार आहे अस समजतात.

-  टॅक्स फ्री हा बॉण्ड ८० प्रमाणे सवलत देतो अस मानणारे ७६% भारतीय आढळुन आले.

-  ९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ८% लोक निवृत्ती जीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंन्स पॉलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ५% पेक्षाही कमी असतो- ह्याचे मुख्य कारण विमा कंपन्याचे सावज शोधणारे एजंट.

-  संपुर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी आढळुन आली.

-  भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात. जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हॉस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही. इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.

-  भारतात साधारण विमा (जनरल इन्शुरन्स) घेणाऱ्यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा (टर्म प्लॅन) घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले.

-  एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कडून रोजगार मिळतो (ह्यात विमा एजंटांचा समावेश आहे).

-  आपल्या गुंतवणुकदारांना ४ ते ५% परतावा (सी.ए.जी.आर.) देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे .

-  पोस्टल लाईफ घेणाऱ्यांची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे.

-  भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंत्रक असली तरी भारतातील फक्त 5 ते 8% लोकच यात गुंतवणुक करतात. म्युच्युअल फंड वितरकांचा प्रचंड अभाव व मिळणारे नगण्य कमिशन याचे प्रमुख कारण असुन त्यांची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त अंदाजे दीड लाख इतकीच आहे. त्यातील फक्त 25% प्रत्यक्ष काम करताना आढळतात. त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंत्रक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही. शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंत्र नाही. म्युचअल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक वाढत आहे.

-  ५४ ईसी बॉण्डइंफ्रा बॉण्डपीएमएसकार्पोरेट एफडी इ. फायनान्शियल प्रॉडक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत.

-   भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारा पैकी एक असुनही फक्त 6% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या 40 वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात. भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंत्रक सेबी अपयशी ठरले आहेत अस मत आहे.

*आर्थिक साक्षर व्हा*

माहिती व मार्गदर्शन 

व्हॉटसअप

गुंतवणूक व असेट अलोकेशन एकत्रित प्लॅटफॉर्म साठी लिंक  :

Empathee Solutions

No comments:

Post a Comment